गदिमा नवनित
  • दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस.किती कष्ट माये,सुखे साहिलेस,
    जिण्यालागि आकार माझ्या दिलास,तुझ्या वंदितो माउली,पाउलांस!
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)
  • आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.

    आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.

    गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
  • Box-C-19
  • मार ही ताटिका रामचंद्रा
    Jod Zani Kamruka Sod Re Sayaka

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: राम फाटक      Singer: Ram Phatak
  • अल्बम: गीतरामायण (आकाशवाणी)      Album: GeetRamayan (Akashwani)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • जोड झणिं कार्मुका
    सोड रे सायका
    मार ही ताटिका, रामचंद्रा !

    दुष्ट मायाविनी
    शापिता यक्षिणी
    वर्तनीं दर्शनीं, ही अभद्रा

    तप्त आरक्त हीं पाहतां लोचनें
    करपल्या वल्लरी, करपलीं काननें
    अतुलबलगर्विता
    मूर्त ही क्रूरता
    ये घृणा पाहतां, क्रूर मुद्रा

    ऐंक तें हास्य तूं, दंत, दाढा पहा
    मरुन हसती जणूं, भरुन गेली गुहा
    मृत्यु-छाया जशी
    येतसे ही तशी
    ओढ दोरी कशी, मोड तंद्रा

    थबकसी कां असा ? हाण रे बाण तो
    तूंच मृत्यू हिचा, मी मनीं जाणतो
    जो जनां सुखवितो
    नारीवध क्षम्य तो
    धर्म तुज सांगतो, मानवेंद्रा !

    दैत्यकन्या पुरा, ग्रासुं पाहे धरा
    देव देवेंद्रही, मारि तें मंथरा
    विष्णू धर्मोदधी
    शुक्रमाता वधी
    स्‍त्री जरी पारधी, अरि मृगेंद्र

    धांवली लाव घे, कोप अति पावली
    धाड नरकीं तिला, चालल्या पावलीं
    बघती तव विक्रमां
    देव पुरुषोत्तमा
    होऊं दे पौर्णिमा, शौर्यचंद्रा


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs