गदिमा नवनित
  • नसे राऊळीवा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी!
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • सरयू तीरावरी अयोध्या
    Sharayu Teeravari Ayodhya

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • सरयू - तीरावरी
    अयोध्या मनुनिर्मित नगरी

    त्या नगरीच्या विशालतेवर
    उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
    मधुन वाहती मार्ग समांतर
    रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी

    घराघरावर रत्नतोरणें
    अवती भंवती रम्य उपवनें
    त्यांत रंगती नृत्य गायनें
    मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी

    स्‍त्रीया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक
    पुत्र उपजती निजकुल - दीपक
    नृसंस ना कुणि, कुणि ना नास्तिक
    अतृप्‍तीचा कुठें न वावर, नगरिं, घरीं, अंतरीं

    इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण
    राजा दशरथ धर्मपरायण
    त्या नगरीचें करितो रक्षण
    गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी

    दशरथास त्या तीघी भार्या
    सुवंशजा त्या सुमुखी आर्या
    सिद्ध पतीच्या सेवाकार्या
    बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी

    तिघी स्‍त्रीयांच्या प्रीतसंगमीं
    तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
    एक उणें पण गृहस्थाश्रमीं
    पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतिच्या अंबरी

    शल्य एक तें कौसल्येसी
    दिसे सुमित्रा सदा उदासी
    कैक कैकयी करी नवसासी
    दशरथासही व्यथा एक ती, छळिते अभ्यंतरी

    राजसौख्य तें सौख्य जनांचें
    एकच चिंतन लक्ष मनांचें
    काय काज या सौख्य - धनाचें ?
    कल्पतरूला फूल नसे कां, वसंत सरला तरी


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs