गदिमा नवनित
  • दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा
    Maj Aanun Dya To Harin Ayodhya Natha

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • तोडितां फुलें मी सहज पाहिला जातां
    मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा

    झळकती तयाच्या रत्‍नें श्रृंगावरती
    नव मोहफुलांसम सुवर्ण अंगावरती
    हे नयन भाळले त्याच्या रंगावरती
    ते इंद्रचापसे पुच्छ भासलें उडतां

    तो येउन गेला अनेकदा या दारीं
    दिसतात उमटलीं पदचिन्हें सोनेरी
    घाशिलें शिंग या रंभास्तंभावरी
    तो दिसे सुवर्णी बघा देवरा, कांता

    चालतो जलद-गति, मान मुरडितो मंद
    डोळ्यांत कांहिसा भाव विलक्षण धुंद
    लागला मृगाचा मला नाथ हो छंद
    वेडीच जाहलें तृणांतरीं त्या बघतां

    किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणूं ?
    त्या मृगास धरणें अशक्य कैसे म्हणूं ?
    मजसाठिं मोडिलें आपण शांकरधनू
    जा, करा त्वरा, मी पृष्ठि बांधितें भाता

    कोषांत कोंडिलें अयोध्येंत जें धन
    ते असेल धुंडित 'चरणां' साठीं वन
    जा आर्य, तयातें कुटिरीं या घेउन
    राखील तोंवरी गेह आपुला भ्राता

    सांपडे जरी तो सजीव अपुल्या हातीं
    अंगिंचीं तयाच्या रत्‍नें होतिल ज्योति
    देतील आपणां प्रकाश रानीं राती
    संगती नेउं त्या परत पुरीसी जातां

    जातांच पाहतिल हरिण सासवा, जावा
    करितील कैकयी भरत आपुला हेवा
    ठेवीन तोंवरी जपून गडें तो ठेवा
    थांबला कशास्तव धनुर्धरा हो आतां ?

    फेंकून बाण त्या अचुक जरी माराल
    काढून भाउजी घेतिल त्याची खाल
    त्या मृगासनीं प्रभु, इंद्र जसे शोभाल
    तो पहा, दिसे तो दूर टेकडी चढतां


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs