गदिमा नवनित
  • दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • धन्य मी शबरी श्रीरामा
    Dhanya Mee Shabari Shrirama

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • धन्य मी शबरी श्रीरामा !
    लागलीं श्रीचरणें आश्रमा

    चित्रकुटा हे चरण लागतां
    किती पावले मुनी मुक्तता
    वृक्षतळिं या थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा

    या चरणांच्या पूजेकरितां
    नयनिं प्रगटल्या माझ्या सरिता
    पदप्रक्षालन करा, विस्मरा प्रवासांतल्या श्रमां

    गुरुसेवेंतच झिजलें जीवन
    विलेपनार्थे त्याचे चंदन
    रोमांचांचीं फुलें लहडलीं, वठल्या देहद्रुमा

    निजज्ञानाचे दीप चेतवुन
    करितें अर्चन, आत्मनिवेदन
    अनंत माझ्या समोर आलें, लेवुनिया नीलिमा

    नैवेद्या पण काय देउं मी ?
    प्रसाद म्हणुनी काय घेउं मी ?
    आज चकोरा-घरीं पातली, भुकेजली पौर्णिमा

    सेवा देवा, कंदमुळें हीं
    पक्‍व मधुरशीं बदरिफळें हीं
    वनवेलींनीं काय वाहणें, याविन कल्पद्रुमा ?

    क्षतें खगांचीं नव्हेत देवा,
    मीच चाखिला स्वयें गोडवा
    गोड तेवढीं पुढें ठेविलीं, फसवा नच रक्तिमा

    कां सौमित्री, शंकित दृष्टी ?
    अभिमंत्रित तीं, नव्हेत उष्टीं
    या वदनीं तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी | Related Marathi Songs