गदिमा नवनित
  • चंदनी चितेत जळला चंदन,
    सुगंधे भरुन मर्त्यलोक!.
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • पेटवी लंका हनुमंत
    Petavi Lanka Hunumanta

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • लीलया उडुनी गगनांत
    पेटवी लंका हनुमंत

    नगाकार घन दिसे मारुती
    विजेपरी तें पुच्छ मागुतीं
    आग वर्षवी नगरीवरती
    गर्जना करी महावात

    या शिखराहुन त्या गेहावर
    कंदुकसा तो उडे कपीवर
    शिरे गवाक्षीं पुच्छ भयंकर
    चालला नगर चेतवीत

    भडके मंदिर, पेटे गोपुर
    द्वार कडाडुन वाजे भेसुर
    रडे, ओरडे, तों अंतःपुर
    प्रकाशीं बुडे वस्तुजात

    जळे धडधडा ओळ घरांची
    राख कोसळे आकारांची
    चिता भडकली जणूं पुरांची
    राक्षसी करिती आकांत

    कुणी जळाले निजल्या ठायीं
    जळत पळत कुणि मार्गी येई
    कुणि भीतीनें अवाक होई
    ओळखी नुरल्या प्रलयांत

    माय लेकरां टाकुन धावे
    लोक विसरले नातीं नावें
    उभें तेवढें पडें आडवें
    अचानक आला कल्पांत

    खड्गे ढाली पार वितळल्या
    वीरवृत्ति तर सदेह जळल्या
    ज्वाळेमाजीं ज्वाळा मिळाल्या
    सघनता होय भस्मसात

    वारा अग्‍नी, अग्‍नी वारा,
    नुरे निवारा, नाहीं थारा
    जळल्या वेशी, जळे पहारा
    नाचतो अनल मूर्तिमंत


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs