Select * From data_category Where (Active="1") and (RestrictedEditionAccess Like "%articles:%") Order By `articles` Asc,CategoryNameInMarathi Desc,CategoryID Asc
काही मृत्यू मनाला चटला लावून जातात,मा.मीनाताई ठाकरे,शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे,विलासरावजी देशमूख,प्रमोदजी महाजन व आता गोपीनाथजी मुंडे...
१९६७ साली उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातून स.गो.बर्वे विजयी झाले,केंद्र सरकारमध्ये त्यांचा अर्थमंत्री म्हणून प्रवेश निश्चित होता पण दुर्दैवाने त्याच रात्री त्यांचे ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले,गदिमांचा व त्यांचा स्नेह होता,एका
पत्रकाराने फोन वर त्यांना प्रतिक्रिया विचारली व गदिमा उत्तरले.....आज गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने त्याच ओळी परत आठवतात...
अजुनी कुंकुमतिलक कपाळी| सत्काराच्या गळ्यात माळा|
राजमान्यता स्वीकाराच्या भरात आहे अजुनी सोहळा|
तोच काय हे घडे अचानक| चैतन्याचे होय कलेवर|
लक्ष मुखातील जपनादाचा होय हुंदका एक अनावर|
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.