वि.वा शिरवाडकर: माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
Box-C-28
शपथ
Shapath
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला
नकोस टाकुन जाउं जिवलगा अशी एकटी मला
अर्ध्या रातीं रंगत होतीं गाणीं गावांतली
फेर धरुनिया णाचत होत्या बारा घरच्या मुली
बंद कवाडाआड,तुझ्या मी उरिं माथा टेकिला
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला!
त्या रातीची
ऊब लोंकरी,ओलावा चंदनी
खिडकीमधुनी बघूं लागली न्हालेली चांदणी
बोल लावुनी तिला झणी मीं सरपडदा ओढिला
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला!
झिम्मा फुगडी खेळुं लागला वारा धारांसवें
दबला माझा श्वास,मोकळीं तृप्तीचीं आंसवें
अदेय त्याचा दिला लाडक्या नजराणा मी तुला
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला!
सरला श्रावण हिरवी गादी चालवितो भादवा
कितीही लुटला तरी वाटतो लाभ तुझा मज नवा
नको पेटवूं विरहानें हा सौख्याचा बंगला
श्रावणांतल्या त्या रातीची शपथ घालितें तुला!
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.