देव, दैत्य वा सुर, नर, किन्नर
उचलुं न शकले त्यास तसूभर
तसूभरी ना सरलपणा त्या चापाचा वांकला
कोण वांकवुन त्याला ओढिल ?
प्रत्यंचा त्या धनूस जोडिल ?
सोडिल त्यांतुन बाण असा तर कोणी ना जन्मला
उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर
निजनयनीं तें धनू पहा तर
बघा राघवा, सौमित्री तर औत्सुक्यें दाटला
उत्साहाने निघती मुनिजन
चला संगतीं दोघे आपण
आपण होतां सहप्रवासी भाग्यतरू ये फला
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....