उपदेशा हा न समय
लंकेशा, होइ अभय
कर्तव्या कुंभकर्ण नाहिं विसरला
बोलवि मज बंधुभाव
रणिं त्याचा बघ प्रभाव
रिपुरक्तें भिजविन मी आज पृथ्वीला
सहज वध्य मजसि इंद्र
कोण क्षुद्र रामचंद्र !
प्राशिन मी क्षीरसिंधु, गिळिन अग्निला
वचन हाच विजय मान
करि सौख्यें मद्यपान
स्कंधीं मी सर्व तुझा भार घेतला
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.