मैना राणी चतुर शहाणी
सांगे गोड कहाणी
कहाणीत त्या पशुपक्षांना
अवगत असते वाणी.....
सिह वनाचा असतो राजा
घेती त्याची चिठ्ठी
वाघ वागतो भिऊन त्याला
गुडघे टेकी हत्ती
अती चतुर कोल्हा कोणी
सिहा पाजी पाणी
सांगे गोड कहाणी......
मैना राणी
कोल्ह्याचाही काढे काटा
कोणी करकोचा
घरी बोलावून पाणउतारा
करी पाहुण्याचा
कडी वरी त्या कडी करूनिया
टोला कोल्हा हाणी
सांगे गोड कहाणी......
शाल म्हणुनी खाल पांघरे
गाढव वाघाची
त्यास पाहता झोप उडाली
जंगल भागाची
एक कोंबडा उघडकीस पण
ढोंगच त्याचे आणी
सांगे गोड कहाणी.....
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.