पुरे खेळणे आता बाळा
थांबव चाळा, थांबव वाळा
शब्द ऐकते झोपेमधुनी चाळवते वारे !
मेघ पांढरे उशास घेउनी
चंद्र तारका निजल्या गगनी
वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे !
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....