पुरे खेळणे आता बाळा
थांबव चाळा, थांबव वाळा
शब्द ऐकते झोपेमधुनी चाळवते वारे !
मेघ पांढरे उशास घेउनी
चंद्र तारका निजल्या गगनी
वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे !
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.