चांद मोहरे, चांदणे झरे
झोपेतच गाली असा हससी का बरे
गगनातील नीलपरी
उतरूनिया भूमिवरी
उचलुनिया नेती तुला उंच काय रे ।।१।।
उंच उंच गगनी तुला
काय दिसे सांग मुला
दिसते का हळू विमान एक संचरे ।।२।।
बसुन आत कोण हसे
कुशल कुणी तरुण पुसे
खचित तेच प्राणनाथ सांगू काय रे ।।३।।
जाग जरा नीज सोड
पापा दे मजसि गोड
फिरून जाय लंघुनिया, सात अंबरे ।।४।।
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.