ब्रह्मचारी मज देतो टॉफी
गृहस्थ पाजितो काळी कॉफी
पण संसार जयासी थाटवा
असा कुणी मज भेटावा
एकोणिस वा वीस वयाचा
मलाच राहील वचक जयाचा
मन पतंग त्याने काटावा
असा कुणी मज भेटावा
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.