फेसाळ दर्याचं पाणी खारं
पिसाट पिऊनी तुफान वारं
ऊरात हिरव्या भरलं हो सारं
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर
टाकून टाकशील किती रं जाळी
मेघाची सावली कुणाला घावली
वार्यानं अजुनी पाठ
नाही शिवली
वाटेला बांग दिली हिच्या समोर
केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
फुलांची वेणी नखर्यानं माळली
कुणाला ठावं रं कुणावर भाळली
प्रीतिचा चोर तिचा राजाहून थोर
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.