कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
त्यांच्या काळजात भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा
उंची माडांची या जवळूनी मापवा
सोडून दे रे खोड्या सार्या
शिडात शिर रे अवखळ वार्या
शिर शिडात अवखळ वार्या
झणी धरणीला गलबत टेकवा
झणी धरणीला या गलबताला टेकवा
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.