किंचित् ढळती निळी ओढणी
भाळावरती हळुच ओढुनी
तीहि न्याहळी त्यास मोहुनी
नयनांचे मग मुके जबाब
तोच येउनी भिडली काना
राघोबाची मेघगर्जना
नगरपार ही चलु द्या सेना
वळला घोडा सरला लाभ
अटकेवरती झेंडा रोवुनि
पुण्यास आल्या परत पलटणी
तरीहि त्याच्या मनी लोचनी
तरळत होते एकच ख्वाब
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.