किंचित् ढळती निळी ओढणी
भाळावरती हळुच ओढुनी
तीहि न्याहळी त्यास मोहुनी
नयनांचे मग मुके जबाब
तोच येउनी भिडली काना
राघोबाची मेघगर्जना
नगरपार ही चलु द्या सेना
वळला घोडा सरला लाभ
अटकेवरती झेंडा रोवुनि
पुण्यास आल्या परत पलटणी
तरीहि त्याच्या मनी लोचनी
तरळत होते एकच ख्वाब
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.