उगा हासला तो, उगा लाजले मी
करी वीज त्याच्या, उरी भाजले मी
ठसा राहिला ग मुक्या भाषणाचा !
पुढे चालले मी, फिरे पाय मागे
कशाची कळेना अशी ओढ लागे
सुटे त्यात वारा खुळ्या श्रावणाचा !
झरू लागल्या ग ढगांतून धारा
मनींच्या विजेचा मनी कोंडमारा
ठिकाणा तरी ग कुठे साजणाचा ?
भिजे पावसाने जरी अंग सारे
उफाळून येती उरींचे निखारे
शिरे नाद अंगी जणू पैंजणाचा !
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.