डोळ्यांत रेखिले काजळ मऊ झोंबते
कानात घातले लोलक मी
लोंबते
फिरफिरुनी माझी मी ऐन्याशी थांबते
गोर्या भाळी कोरून ल्याले पुनवेचा चांदवा
मज पहावयास येतील ग कोण ते ?
पाहिले काल पण नाव न मी जाणते
परि गुणास त्यांच्या नगरी वाखाणते
नुसती येता सई, उरी या घुमतो ग पारवा
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..