डोळ्यांत रेखिले काजळ मऊ झोंबते
कानात घातले लोलक मी
लोंबते
फिरफिरुनी माझी मी ऐन्याशी थांबते
गोर्या भाळी कोरून ल्याले पुनवेचा चांदवा
मज पहावयास येतील ग कोण ते ?
पाहिले काल पण नाव न मी जाणते
परि गुणास त्यांच्या नगरी वाखाणते
नुसती येता सई, उरी या घुमतो ग पारवा
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.