श्रीकृष्णाचे नयन मनोहर राधा चुंबी रात्री ग
तिच्या मुखीचा पिंक राहिला श्रीकृष्णाच्या नेत्री ग
राधेचेही चुंबी डोळे परत फेडीने जगजेठी
तिच्या नेत्रीचे काजळ उरले श्रीकृष्णाच्या ओठी
आली होती मेंदी लावून राधा पाया-नखा
आर्जविता तिज पाया पडला नटवर कृष्णसखा
त्या मेंदीची टिकली राही तशीच त्याच्या भाळी ग
तीच भूषणे लेवून परते श्याम उजळत्या वेळी ग
तीरकमठ्यासह दोन पारधी गोरा पर्वत चढले ग
तीळास फटुनी नखाएवढ्या तळ्यात दोघे पडले ग
बुडले ते ना वरी निघाले रमले त्या ठायी
अशी कशी ही सांग बाई झाली नवलाई
दोन चोरटे पुरुषी डोळे न्याहाळती नवनार
पायापासुनि तिला न्याहाळीत वरी पोचले पार
हनुवटीवरती तीळ तियेच्या गालावरती खळी
तिथेच खिळुनी बसले वेडे भान न त्यांना मुळी
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.