भरुनि येता हात जरा ती झोका थांबवुनी
उठे पाळण्यापाशी येई पाही डोकावुनी
हात पाय नाचवी श्रीहरि हासुनी वर पाही
माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई
दिसमासाने कृष्ण
वाढला लागे रांगाया
धरावयासी धावे माता वार्यासी वाया
पुरे पडे ना वाडा अंगण अपुरे त्या होई
माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....