गदिमा नवनित
  • मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा
    जरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात?
    दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें ?
    Maj Sang Laxmana Jau Kuthe

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें ?
    पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें ?

    कठोर झाली जेथें करुणा
    गिळी तमिस्‍त्रा जेथे अरुणा
    पावक जिंके जेथें वरुणा
    जें शाश्वत त्याचा देंठ तुटे

    व्यर्थ शिणविलें माता जनका
    मी नच जाया, नवे कन्यका
    निकषच मानीं कासें कनका
    सिद्धीच तपाला आज विटे

    अग्‍नी ठरला असत्यवक्ता
    नास्तिक ठरवी देवच भक्ता
    पतिव्रता मी तरि परित्यक्ता
    पदतळी धरित्री कंप सुटे

    प्राण तनुंतून उडूं पाहती
    अवयव कां मग भार वाहती ?
    बाहतसे मज श्रीभागीरथी
    अडखळें अंतिचा विपळ कुठें ?

    सरले जीवन, सरली सीता
    पुनर्जात मी आतां माता
    जगेन रघुकुल-दीपाकरितां
    फल धरीं रूप हें, सुमन मिटें

    वनांत विजनी मरुभूमीवर
    वाढवीन मी हा वंशांकुर
    सुखांत नांदो राजा रघुवर
    जानकी जनांतुन आज उठे

    जाइ देवरा, नगरा मागुती
    शरसे माझे स्वर मज रुपती
    पती न राघव, केवळ नृपती
    बोलतां पुन्हा ही जीभ थटे

    इथुन वंदिते मी मातांना
    प्रणामपोंच्वि रघुनाथांना
    आशिर्वच तुज घे जातांना
    आणखी ओठिं ना शब्द फुटे

    श्रीराम.. श्रीराम.. श्रीराम..


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs