गदिमा नवनित
  • एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात,
    शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • नको रे जाउं रामराया
    Nako Ra Jaoo Ramaraya

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया
    नको रे जाउं रामराया

    शतनवसांनीं येउन पोटीं
    सुखविलेंस का दुःखासाठीं ?
    प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया

    कशी मूढ ती सवत कैकयी
    तीही मजसम अबला, आई
    आज्ञा देइल का भरता ती कांतारीं जाया ?

    तृप्त हो‍उं दे तिचीं लोचनें
    भरत भोगुं दे राज्य सुखानें
    वनीं धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया ?

    सांगुं नये तें आज सांगतें
    मजहुन ह्यांना ती आवडते
    आजवरी मी कुणां न कथिल्या मूक यातना या

    तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
    जळतच जगलें मुला, जीवनीं
    तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतिं तरी छाया

    अधर्म सांगूं कसा बालका
    तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
    माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारीं न्याया

    तुझ्यावांचुनी राहुं कशी मी ?
    वियोग रामा, सांहु कशी मी ?
    जमदग्‍नीसम तात तुझें कां कथिति न माराया

    तुझ्या करें दे मरणच मजसी
    हो राजा वा हो वनवासी
    देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs