गदिमा नवनित
  • दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • आज कां निष्फळ होती बाण ?
    Aaj Ka Nishphal Hoti Baan

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • आज कां निष्फळ होती बाण ?
    पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण ?

    शरवर्षावामाजीं दारुण
    पुन्हां तरारे तरुसा रावण
    रामासन्मुख कसे वांचती रामरिपूचे प्राण ?

    चमत्कार हा मुळिं ना उमजे
    शीर्ष तोडितां दुसरें उपजें
    रावणांग कीं असे कुणी ही सजिव शिरांची खाण ?

    शत शिर्षे जरि अशीं तोडिलीं
    नभीं उडविलीं, पदीं तुडविलीं
    पुन्हां रथावर उभाच रावण, नवें पुन्हां अवसान

    इंद्रसारथे, वीर मातली
    सांग गूढता मला यांतली
    माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान

    वधिला खर मी, वधिला दूषण
    वधिला मारिच, विराध भीषण
    हेच बाण ते केला ज्यांनी वाली क्षणिं निष्प्राण

    ज्यांच्या धाकें हटला सागर
    भयादराचे केवळ आगर
    त्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण ?

    सचैल रुधिरें न्हाला रावण
    सिंहापरी तरि बोले गर्जुन
    मलाहि ठरला अवध्य का तनुधारी अभिमान ?

    सचिंत असतिल देव, अप्सरा
    सुचेल तप का कुणा मुनिवरा ?
    व्यर्थच झालें काय म्हणूं हें अवघें शरसंधान ?


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs