गदिमा नवनित
  • कधिं न चळावे चंचल हें मन
    श्रीरामा, या चरणांपासुन
    जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • निरोप कसला माझा घेता
    Nirop Kasala Majha Gheta

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • निरोप माझा कसला घेता
    जेथें राघव तेथें सीता

    ज्या मार्गी हे चरण चालती
    त्या मार्गी मी त्यांच्या पुढती
    वनवासाची मला न भीती
    संगे आपण भाग्य विधाता !

    संगें असता नाथा, आपण
    प्रासादाहुन प्रसन्न कानन
    शिळेस म्हणतिल जन सिंहासन
    रघुकुलशेखर वरी बैसतां

    वनीं श्वापदें, क्रूर निशाचर
    भय न तयांचे मजसी तिळभर
    पुढती मागें दोन धनुर्धर
    चाप त्यां करीं, पाठिस भाता

    ज्या चरणांच्या लाभासाठीं
    दडलें होतें धरणीपोटीं
    त्या चरणांचा विरह शेवटीं -
    काय दिव्य हें मला सांगतां ?

    कोणासाठीं सदनीं राहूं ?
    कां विरहाच्या उन्हांत न्हाऊं ?
    कां भरतावर छत्रें पाहूं ?
    दास्य करूं का कारण नसतां ?

    कां कैकयि वर मिळवी तिसरा ?
    कां अपुल्याही मनी मंथरा ?
    कां छळितां मग वृथा अंतरा ?
    एकटीस मज कां हो त्यजितां ?

    विजनवास या आहे दैवीं
    ठाउक होतें मला शैशवीं
    सुखदुःखांकित जन्म मानवी
    दुःख सुखावें प्रीति लाभतां

    तोडा आपण, मी न तोडितें
    शत जन्मांचें अपुलें नातें
    वनवासासी मीही येतें
    जाया-पति कां दोन मानितां ?

    पतीच छाया, पतीच भूषण
    पतिचरणांचें अखंड पूजन
    हें आर्यांचें नारीजीवन
    अंतराय कां त्यांत आणितां ?

    मूक राहतां कां हो आतां ?
    कितिदा ठेवूं चरणीं माथा ?
    असेन चुकलें कुठें बोलतां
    क्षमा करावी जानकिनाथा


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs