गदिमा नवनित
  • कधिं न चळावे चंचल हें मन
    श्रीरामा, या चरणांपासुन
    जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
    Paradhin Aahe Jagti Putra Manavacha

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

    माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
    राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
    खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

    अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
    सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
    वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

    जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
    दिसे भासते तें सारें विश्व नाशवंत
    काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?

    तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
    अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
    मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

    जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
    दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
    वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

    दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
    क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

    नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
    तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
    अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

    नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
    पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
    मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा

    संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
    अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
    तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

    पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
    प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
    मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs