गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.
साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
कुठें चंदना, गौरांगी ती ?
कुंदलते, ती कुठें सुदती ?
कोठें आम्रा, विनयवती ती ?
शहारतां कां वार्यावांचुनि ?
घात-घटी का पुन्हां पातली ?
सीते, सीते, सखे मैथिली !
हांक काय तूं नाहिं ऐकिली ?
येइ, शिळेच्या बसूं आसनीं
पहा लक्ष्मणा, दिसती डोळे
प्रियेचेच ते विशाल भोळे
मृगशावक हें तिचें कोवळें
का याच्याही नीर लोचनी ?
अबोल झाले वारें पक्षी
हरिली कां कुणि मम कमलाक्षी ?
का राक्षस तिज कोणि भक्षी
शतजन्माचें वैर साधुनी ?
पुनश्च विजयी दैव एकदां
घातांवर आघात, आपदा
निष्प्रभ अवघी शौर्यसंपदा
जाइ बांधवा, पुरा परतुनी
काय भोगणें आतां उरलें ?
चार दिसांचें चरित्र सरलें
हे दुःखांचे सागर भरलें
यांत जाउं दे राम वाहुनी
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....