गदिमा नवनित
  • दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • रघुवरा, बोलत कां नाहीं ?
    Raghuvara Bolat Ka Nahi

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • काय ऐकतें ? काय पाहतें ? काय अवस्था ही ?
    रघुवरा, बोलत कां नाहीं ?

    जायेआधीं मरण पतीचें, हें कैसें घडलें ?
    दैवच अंती तुटुन खड्गसे माझ्यावर पडलें
    पुण्यहीन का ठरल्या लोकीं कौसल्यामाई ?

    ज्योतिषांचीं ग्रहगणितें का सर्वथैव चुकलीं ?
    अभागिनी ही कशी अचानक सर्वस्वा मुकली ?
    धुळींत निजले पुरुषोत्तम का या मूढेपायीं ?

    ओळखितें मी कमलनेत्र हे, ओळखितें श्रवणें
    सरे न का ही झोंप राघवा, दीनेच्या रुदनें ?
    गतीहीन कां झाली सृष्टी, सुन्न दिशा दाही ?

    सुवर्णधनु हें ओळखिलें पण कुठें महाबाहु ?
    श्यामवर्ण ती मूर्त पुन्हां मी कुठें कधीं पाहूं ?
    नयन जाहले रडुन कोरडे, अंगाची लाही

    विवाहसमयीं शपथ दिली ती विसरलांत सदया !
    पुशिल्यावांचुन स्वर्गी गेला सोडुनिया जाया
    ऐकलेंत का ? - जनकनंदिनी आर्त तुम्हां बाही

    रघुकुलतिलका, तुम्ही भेंटला पितरांना स्वर्गी
    परक्या हातीं सजीव उरली अर्धांगी मार्गी
    रघुकुलजातें शोभुन दिसली रीत तरी का ही ?

    अथांग सागर जिंकुन आला कशास मजसाठीं ?
    काय जन्मलें कुलनाशिनि मी धरणींच्या पोटीं ?
    जनकें केले यज्ञ, तयांची काय सांगता ही ?

    हे लंकेशा, ज्या शस्‍त्रानें मारविलें नाथां
    घाव तयाचा घाल सत्वरीं सीतेच्या माथां
    रामामागें तरी जाउं दे अंतीं वैदेही


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.भा.भावे
    'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs