गदिमा नवनित
  • नजिक नाझरें श्रीधर कविंचे,नदी माणगंगा
    नित्य नांदते खेडे माझें धरुनि संतसंगा!
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)
  • आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.

    आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.

    गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
  • Box-C-19
  • पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
    Paradhin Aahe Jagti Putra Manavacha

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (आकाशवाणी)      Album: GeetRamayan (Akashwani)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

    माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
    राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
    खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

    अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
    सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
    वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

    जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
    दिसे भासते तें सारें विश्व नाशवंत
    काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?

    तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
    अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
    मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

    जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
    दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
    वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

    दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
    क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

    नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
    तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
    अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

    नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
    पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
    मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा

    संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
    अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
    तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

    पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
    प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
    मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs